साईनगर येथील नितीनविहार परिसरातील आसरा माता मंदिर येथे उपमहापौर मा श्री सचिन भेंडे यांनी आज मातेची आरती करून वृक्षारोपण लागवडस सुरवात केली.
यावेळी त्यांनी सांगितले जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि प्रदूषणामुळे ऋतूचक्र बदलले आहे. तीव्र उन्हाळा, दुष्काळ आणि पूर यांसारख्या समस्या वाढत आहेत.
यावर मात करण्यासाठी ‘एक व्यक्ती, एक झाड’ हा संकल्प करणे गरजेचे आहे. केवळ रोपे लावून चालणार नाही, तर झाडे जगवण्याची जबाबदारीही आपण घेतली पाहिजे.
यावेळी गुल्हाने साहेब,कुंभरे साहेब,वानखडे साहेब, म्हहले साहेब,डाखोरे साहेब,सरोदे साहेब, सारडा साहेब, गुल्हाने साहेब,दहीकर साहेब, लांजेवार साहेब, आणि आसरा माता महिला भजनी मंडळी, तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
